कोणत्याही विद्यार्थी वर्गाचे नुकसान होणार नाही.... प्रदेशाध्यक्ष संग्राम शेवाळे

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


**पुणे मधील वाडिया कॉलेज मधील चुकीच्या निकालाबाबत संग्राम शेवाळे यांनी घेतली ताबडतोब दखल**

पुणे:-जनता दल (से) विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य.नेहमी ही संघटना नेहमी विद्यार्थी हितासाठी काम करत आलेली आहे. पुणे मधील वाडिया कॉलेज मध्ये ज्या 2 विभागीय परीक्षा घेण्यात आल्या त्याचे निकाल विद्यापीठ प्रशासनाकडे न पाठवल्यामुळे (MSc.physics) विद्यार्थी यांचे निकाल चुकीचे लागले आहेत.ही तक्रार विद्यार्थी यांनी प्रदेशाध्यक्ष संग्राम शेवाळे यांना सांगतच शेवाळे यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे परीक्षा विभाग प्रमुख महेश काकडे सर यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधला यावेळी काकडे आणि शेवाळे यांच्यात सकारत्मक चर्चा झाली. कोणत्याही विद्यार्थी वर्गाचे नुकसान होणार नाही अशी काकडे सर यांनी सांगितले. असे आमच्या माध्यमांशी शेवाळे यांचे सचिव (प्रदेश कार्यलय मुंबई) यांनी बोलताना सांगितले.