पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*Lockdown ४५ दिवस घेऊन देश कोरोना मुक्त झाला पाहिजे त्यासाठी करोन पान तंबाखू गुटका बंदी गरजेचे : प्रशांत धुमाळ*
भारतात नव्हे तर जगात करोना ने धुमाकुळ घातला आहे..भारताची लोकसंख्या जास्त असून देखील करोनाचा फैलाव जगाच्या वेगाच्या मानाने कमी आहे ... कारण लॉकडाऊन मुळे शासनाने जनता घरात बसवली आहे...
*करोना चा संसर्ग मुख्यत्वे थुंकीतुन , लाळीतुन , श्वसनातून होतो.. भारतात पान तंबाखू गुटका सारखे पदार्थ खाऊन थुंकणाऱ्याची संख्या मोठी आहे... शासकीय कार्यालय रस्ते भिंती कोपरे हे यांचे निष्कारण थुंकण्याचे ठिकाणे आहेत...करोना बाधीत व्यक्ती जर असा वरील कोणत्याही जागेवर थुंकला तर भारतात करोना किती धुमाकुळ घालील याचा अंदाज कुठलाही भारतीय बांधु शकत नाही*
*ज्या दिवशी लॉकडाऊन उठेल त्या दिवशी ह्या तंबाखू पान गुटका खाणारे व करोनाचे सुप्त वाहक भारतात किती थैमान घालतील याचा अंदाज न लावलेलाच बरा...*
*जोपर्यंत लॉक डाऊन चालू आहे तोपर्यंत शासनाने भारतात तंबाखू गुटका पानमसाले इत्यादी थुंकण्यास प्रवृत्त करणारे तंबाखूजन्य व तंबाखू विरहीत पदार्थांचे उत्पादन सेवन व विक्री देशात त्वरित बंद करावे... उत्पादीत माल जप्त करून गोठवण्यात यावा.. नष्ट करण्यात यावा.. हि बंदी पुढील दोन वर्षे अथवा कोव्हीड १९ चा नायनाट होईपर्यंत जनहितार्थ राष्ट्रहितार्थ लागू करावी..*
*सार्वजनीक ठिकानी तंबाखू पान गुटका सेवन करणे किंवा थुंकणे हे दखलपात्र गुन्हे जाहीर करावे.*
*महाराष्ट्र शासनाने या बाबत गंभीर होऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे नाहीतर कोरोना वाढल्याशिवय राहणार नाही*