कोथळीगडाला गतवैभव प्राप्त करून देणारे खरे मावळे-अभिनेते जयवंत वाडकर ऐतिहासिक पेठ किल्ल्याला सागवान दरवाजा..

 









 

कोथळीगडाला गतवैभव प्राप्त करून देणारे खरे मावळे-अभिनेते जयवंत वाडकर

ऐतिहासिक पेठ किल्ल्याला सागवान दरवाजा..

कर्जत,दि. 6 गणेश पवार

                        पुणे जिल्ह्याच्या हद्दीला लागून असलेल्या कर्जत तालुक्यातील पेठ गावाच्या मागे उभा असलेल्या कोथळीगडाचा मुख्य दरवाजा आता बंदिस्त झाला आहे.त्यासाठी 700 किलो वजनी सागवान दरवाजा तेथ पर्यंत नेऊन या किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देणारे आताच्या युगातील तरुण खरे मावळे आहेत असे प्रतिपादन जेष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी केले.सह्याद्री प्रतिष्ठान च्या माध्यमातून गेली काही वर्षे सातत्याने कोथळीगडावर कामे सुरू आहेत.

                         सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र मधील कर्जत विभाग यांच्या संकल्पनेतून पेठ गावाच्या मागे उभा असलेल्या किल्ले (कोथळी)गडावर बसविलेल्या सागवानी दरवाजा लोकापर्ण सोहळा भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये,मुळशी पॅटर्न अभिनेता रमेश परदेशी सह शेकङो शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पङला.अवघ्या आठ वर्षाच्या  कार्तिक भरत मोरे या चिमुकल्या चा लिंगाणा सर केला म्हणून तर ज्यांनी पेठ( कोथळी)गडाचा दरवाजा घडवला ते बबन पारधी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.आलेल्या सर्व दुर्गप्रेमी व दुर्गसेवक यांच्यासाठी मंडपाची व्यवस्था  सोहळ्याला व्यासपीठावर पेठ गावचे सरपंच दत्ताभाऊ पिंपरकर,मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील,पोलीस पाटील आशा गोपाल सावंत,अभिजित घरत,शिवसेनेचे उपतालुका प्रमुख दिलीप ताम्हाणे,प्रगत शेतकरी मंगेश सावंत,कर्जत परीसरातील शिवप्रेमी कर्जत पोलीस आणि शेकङोच्या संख्येने शिवभक्त,पेठ ग्रामस्थ,महिला वर्ग उपस्थित होते.

                                  गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठ गावातील वेशीपासून ते गावातील हनुमान मंदिरापर्यत कर्जत येथील शिवतांडव या ढोल ताशांच्या गजरात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत पालखीचे प्रस्थान गडावर झाले.

त्यावेळी मावळ्यांशी संवाद साधताना अभिनेते जयवंत वाडकर यांनी बोलताना कपाळावर केवळ चंद्रकोर लावून छञपतीचे मावळे होता येत नाही.तर पेठ येथील (कोथळी)गङाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जीवाची पर्वा न करता सागवानी दरवाजा बसविण्याचे कार्य करणारे खरे मावळे आहेत असे उद्गार प्रसिद्ध अभिनेते जयवंत वाङकर यानी महा दरवाजा लोकापर्ण प्रसंगी काढले.

                        यावेळी संतोष पिंपरकर,मंगेश सावंत,हेमंत ठाणगे, नगरसेवक संकेत भासे,युवा सेनेचे प्रसाद थोरवे, तसेच पवन मेदगे, कुंदा ठाणगे,भारती तलपे,यांच्यासह खालापूर,पनवेल,पेण, मुबंई, मुरबाड,अलिबाग,सातारा व कोकणातून शिवप्रेमी दुर्गप्रेमी आले होते.जवळपास चारशे किलो वजनाचा पूर्वीचे वैभव आणि अभेद्यपणाचे प्रतिक सागवानी दरवाजा बसविण्यात आला आहे.सोहळा आटोपल्यावर गडाच्या पायथ्याशी उभारलेल्या मंडपात ज्यांनी दुर्गसंवर्धन करण्याचे कार्य केले आहे त्यांना सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र च्या वतीने दुर्गमित्र या प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

 

 

 

फोटो ओळ 

सागवानी दरवाजा बसविल्यानंतर कोथळीगडाचे वैभव असे खुलले आहे.

छाय ः गणेश पवार