ज्ञानेश्वरांचे विश्वात्मक तत्वे जगाला शांतीचा मार्ग दाखवतील  स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे विचार प्रा. डॉ. विश्वनाथ कराड लिखित ‘फे्रन्डस, यू मे बिलिव्ह इट ऑर नॉट’ या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पुणे, 2 ऑक्टोबर: “ संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांनी ज्ञान आणि वैराग्य काय आहे हे सांगितले. त्याच ज्ञानाच्या आधारेच मानवला आत्मज्ञानाची अनुभूती येते. ज्ञानेश्वरांनी सांगितलेले विश्वात्मक तत्वेच हे जगाला शांतीचा मार्ग दाखवेल. व्यक्ति, समष्ठी, सृष्टी आणि प्रकृती या गोष्टी जीवनात अत्यंत महत्वाच्या आहेत. मानवी जीवन सार्थ करण्यासाठी आत्मचिंतनाबरोबरच भक्ती व तपश्चर्या गरजेची आहे.” असे विचार श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.


एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड लिखित ‘फे्रन्डस, यू मे बिलिव्ह इट ऑर नॉट’ या पुस्तकाचे प्रकाशन गोविंददेव गिरीजी महाराज, सुप्रसिद्ध विद्वान व साधक स्वामी योगी अमरनाथ व जगप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.


या प्रसंगी पद्मविभूषण डॉ. विरेंद्र हेगड हे सन्माननीय अतिथि म्हणून उपस्थित होते. तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ.एन.टी.राव, प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे, प्रा.डी.पी. आपटे, डॉ. आर.एम. चिटणीस, प्रा. पुष्पिता अवस्थी, मिटसॉग व पब्लिक पॉलिसीचे वरिष्ठ संचालक रविंद्रनाथ पाटील व वर्ल्ड पीस डोमचे संचालक दर्शन मुंदडा हे उपस्थित होते.


स्वामी गोविंदगिरी महाराज म्हणाले,“ डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी शिक्षण, मानवी हक्क, शांतता अभ्यास, विज्ञान आणि अध्यात्म इत्यादी विविध विषयांवर बरेच पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या पुस्तकामध्ये जगभर पसरलेली नैतिकता सापडेल. जागतिक शांततेचा संदेश देणारी सार्वभौम शांतता आणि सौहार्दाच्या शोधात मानवाधिकार, मानवी मूल्ये आणि सामाजिक बदल दिसेल. डॉ. कराड यांची सर्वात प्रेरणादायक बाब म्हणजे त्यांनी जागतिक शांतता आणि त्यांचे राष्ट्रीय कर्तव्य यावर पुस्तके लिहिणे सुरूच ठेवले आहे. त्यांचे जीवन जसे आहे तसेच पुस्तके ही प्रेरणादायी आहेत.”


डॉ. विजय भटकर म्हणाले,“ डॉ. कराड यांनी उत्तम पुस्तक लिहिले आहे. भगवद गीता, स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर यांनी मानव कल्याणाचा उपदेश केला आहे. त्याच तत्वाचा मानव कल्याणसाठी कसा उपयोग करता येईल हे त्यांनी पुस्तकात नमूद केले आहे. हे पुस्तक कल्पनाकरू शकत नाही अशा प्रकारचे आहे. यातून संपूर्ण मानवजातीला विश्वात्मक संदेश दिला जाईल. निसर्गाचे चक्र सतत विस्तार पावत आहे. हे सर्व कोण घडवित आहे. हे एक गुह्य आहे.”


स्वामी योगी अमरनाथ म्हणाले,“ साधना, तपस्चर्या आणि भक्ती या गोष्टी मानवला परमांनद देतात. या सृष्टीवर साधनेशिवाय काहीच साध्य होऊ शकत नाही. तसेच समर्पण भाव व निष्काम कर्म करीत राहिल्यास मानवाचे उत्थान होते.”  


प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ संत ज्ञानेश्वरांनी 730 वर्षापूर्वी ज्ञानतत्व, विश्वात्मक तत्व सांगितले जे सर्व धर्मासाठी लागू होतात. हे गुपित तत्व आज प्रत्येक मानवासाठी महत्वपूर्ण आहेत. कोरोना व्हायरसच्या काळात हे तत्वे मानवाला सुख, समाधान आणि शांती देईल.”


राहुल कराड यांनी स्वागत पर भाषण केले. प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी पुस्तकाची पार्श्वभूमी सांगितली.


प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व प्रा.डॉ. आर.एम. चिटणीस यांनी आभार मानले.