शहरा पेक्षा ग्रामीण भागातील परिस्थिती भयावह* 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*


ग्रामीण भागातील परिस्थिती खरोखर अतिशय भयानक आहे सरकारी मदतीचा तर मागमूस देखील नाही, कोरोना मुळे पुण्यातील रिक्षा,जीप चालवणारी छोटे मोठे व्यवसाय करणारी मुले त्यांच्या कुटुंबियांसह गावात परतली आहेत हाताला काम नाही खायला आता अन्न नाही त्यामुळे माझ्याशी संपर्क साधला मला पण कोरोना मुळे गावाला जाता आले नव्हते पण काल ठरवलेच आणि निसर्ग चक्रीवादळ या मुळे झालेल्या माझ्या Farm House व गावातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी व गावकऱ्यांना मदत करणे आणि सर्कल ऑफिसर,तलाठी आणि पोलीस पाटील यांना तातडीने बोलवून पंचनामे करून घेण्यासाठी काल मी आणि माझा मुलगा ईशान गावाला गेलो. गावात 3 दिवस लाईट नव्हती आर पी आय style ने ती पण गेल्या गेल्या तातडीने सुरू करून घेतली आणि आमचे गावातील वस्त्यांवरील ठाकर, कांबळे,बिरामने,साठे आणि इतर या कुटुंबाना तसेच वृद्ध लोकांना माझ्या घरी बोलवून घेतले त्यांची चोकशी करून सगळे लवकरच ठीक होईल असे बोलून त्यांना धीर दिला आणि त्याबरोबरच *किराणा माल किट्स,कांदे,बटाटे,लहान मुलांसाठी बिस्किटे,भेळ, प्राथमिक उपचाराची औषधे* यांचे किट द्वारे गावातील लोकांना मदत केली या कठीण प्रसंगी मिळालेली मदत आणि कामे झाल्यामुळे गावकरी आनंदी झाले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहणे हे जगातील सर्वात मोठे सुख होते असे मनाला वाटून गेले ...


*ऍड मंदारभाऊ जोशी*


*राष्ट्रीय निमंत्रक 


आर पी आय (आठवले)


*कायदेशीर सल्लागार अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ


*कायदेशीर सल्लागार ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे