*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*१ मे महाराष्ट्र आणि कामगार दिनाचे औवचित साधून, युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या सहकार्याने कामगारांच्या घरात अन्न - धान्य कीटचे वाटप*
*पुणे :-* कोरोनामुळे संपूर्ण देशात आणि राज्यात लाँक डाऊन असल्याने,तसेच १ मे महाराष्ट्र आणि कामगार दिनाचे औवचित साधून गोर - गरीब ,कष्टकरी कामगार ,धुणीभांडी करणाऱ्या महिला वर्ग,रिक्षाचालक,हातावरचे पोट असणारे कामगारांना आणि इतरांना , युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या सहकार्याने कामगारांच्या घरात अन्न - धान्य कीटचे वाटप ३९ औंधरोड ,बाराथे वस्तीतील काहींना ,पडाळ वस्ती येथील काहींना तसेच शिवाजी नगर गावठाण आणि इतर भागातील कामगार वर्गांना, या अन्न धान्यांचे कीट चे वाटप करण्यात आले.
या मोफत अन्न - धान्यांचे कीट नागरिकांन पर्यंत घरपोच पोहचविण्यासाठी राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाजपचे युवा नेतृत्व मा.निलेशभाऊ निम्हण, सा.पुणे प्रवाहाचे संपादक संतोष सागवेकर, रिपाई (आठवले गट) रोजगार आघाडीचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष सदानंदभाऊ कडलक, युवा नेते अविनाशभाऊ लोंढे, प्रकाश ओव्हाळ आणि संजयभाऊ यादव आदींनी परिश्रम घेतले.
महिला वर्गा पर्यंत पोहचविण्या कामी सुरेखताई वाकडे ३९ औधरोड बाराथे वस्ती (१२कीट),सौ.राधिकाताई चव्हाण - छत्रपती शिवाजी नगर,सौ.शकुंतलाताई सरोदे - घुले रोड,सौ.कुसूमताई मोरे - बुरूड गल्ली ,नेहरु चौक, श्रीमती. संगिताताई चव्हाण - शिवाजी नगर, सौ.मिनाक्षीताई गायकवाड - गणपती माथा - वारजे माळवाडी आणि रोहिणीताई चव्हाण आदी महिलांच्या सहकार्याने हे अन्न - धान्यांचे कीट गरजवंतान पर्यंत पोहचविण्यासाठी सहकार्य लाभले.
मागणी खुप होती,परंतु कीटची संख्या ५० होती.कितीजणांना देणार ,काहींना नाही मिळणार,मिळालेले आभार व्यक्त करणार ,परंतु ज्यांना मिळाले नाही.ते बदनाम करत सुटणार.हे होतंच असते.अश्या मुळे जर आपण मागे हटलो तर , काही तरी प्रमाणातील गरजवंताना हा मदतीचा हात देता आला नसता. असो कारण हे चांगले काम केल्यानंतर अभिनंदनाची थापा पाठीवर पडणे गरजेचे असताना, निंदाच पदरी पडत आहे ,त्यामुळे निंदकाचे जाहीर आभार....
संख्या होती ५० आणि मागणी होती खुप ,स्पष्टीकरण याकरिता की, कोरोना ही राष्ट्रीय नव्हे तर जागतिक आपत्ती असून, जर दानशूर युवा उद्योजक मा.पुनीत बालन आणि ग्रुप जेसे स्व- ईच्छेने पुढाकार घेऊन ,हे प्रवित्र मदतीचा हात या लाँक डाऊन पासून पुढे केला आहे. परंतु पुनीत बालन सरांना आणि ग्रुप किती जणांन पर्यंत पोहचवीणार त्यांना ही मर्यादा या असणारंच , त्यामुळे पुणे शहर -जिल्हा आणि ग्रामीण भागातील दानशूरांनी हा मदतीचा हात पुढे केल्यास गरजवंताना मदत होईल. याकरिता हे स्पष्टीकरण.....
★★याप्रमाणे,राज्य आणि देशात
बारामती पँर्टन किंवा
दानशूर उद्योजक पुनीत बालन आणि ग्रुप पॅटर्न राबविल्यास
★★★कोरोना हारेल आणि भारत देश जिंकेल◆◆
★★ घरी राहा ★★★★★ सुरक्षीत राहा
आपलाच
संपादक संतोष प्रभाकर सागवेकर.
सा.पुणे प्रवाह .