दोन वेळच्या अन्नाची भ्रांत,  गरिबीला कंटाळून आईनेच घेतला सहा वर्षाच्या चिमुरडीचा जीव..

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


दोन वेळच्या अन्नाची भ्रांत, 


गरिबीला कंटाळून आईनेच घेतला सहा वर्षाच्या चिमुरडीचा जीव.....


उत्तर प्रदेश :-  आर्थिक संकटात अडकल्याने तसंत दोन वेळच्या अन्नाची व्यवस्थाही करु शकत नसल्याने आईनेच आपल्या मुलीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


 उत्तर प्रदेशात हा प्रकार घडला असून याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे. 


टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, महिलेला अजून दोन मुलं असून मुलीच्या भविष्याची चिंता तिला सतावत होती. 


महिलेला भविष्यात मुलीच्या लग्नाचा खर्च कसा उचलणार याची काळजी लागली होती. 


उषा देवी असं या महिलेचं नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची आहे. 


याशिवाय दोन वेळच्या अन्नाची व्यवस्थाही ते करु शकत नव्हते. 


मजूर असणाऱ्या पतीच्या अपघातानंतर महिलेवर कुटुंबाची जबाबदारी आली होती. 


महिलेचं मानसिक संतुलन ठीक नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. 


पोलिसांनी महिलेला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image