MITपुणे तर्फे प्रशायकीय सेवेसमोरील आव्हाने या विषयावर चार दिवसीय परिषद १६ ते १९ सप्टेंबर पर्यंत

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे


‘यूपीएससी-२०१९ यशस्वितांचा १२वा राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाईन सत्कार व प्रोत्साहन सोहळा 


प्रशासकीय सेवेच्या परिक्षेची तयारी कशी करावी आणि


       पुणे, १२ सप्टेंबरः एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग), पुणेतर्फे केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) स्पर्धा परीक्षा-२०१९ मधील यशस्वितांच्या १२ व्या राष्ट्रीय स्तरावरील सत्कार आणि प्रोत्साहन सोहळा व प्रशासकीय सेवेच्या परिक्षेची तयारी कशी करावी आणि प्रशासकीय सेवेसमोरील आव्हाने या विषयावरील चार दिवसीय परिषद दि. १६ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२० या कालावधीत ऑनलाईन आयोजित करण्यात आली आहे.


हा सत्कार व प्रोत्साहन सोहळा आणि परिषदेचा उद्घाटन समारंभ बुधवार दि. १६ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११.०० वा. होणार आहे. या समारंभासाठी केंद्रीय प्रशासकीय अधिकरणाचे अध्यक्ष व पटणा उच्च न्यायालयाचे माजी न्या.एल.नरसिंमा रेड्डी, लाला बहाद्दुर शास्त्री नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅडमिस्ट्रेशनचे संचालक डॉ. संजीच चोपडा, लोकसभेचे माजी महासचीव अनूप मिश्रा, नवी दिल्ली येथील मनोहर पर्रीकर इन्स्टीट्यूट फॉर डिफेन्स स्टडी अँड अ‍ॅनॅलिसेसचे संचालक सूजान चिनॉय व भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. एव्हीएस रमेश चंद्रा हे प्रमुख सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, भारतातून पहिला आलेला प्रदिप सिंग याचा सत्कार होणार आहे. त्याला ५१ हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.


या सोहोळ्याचा समारोप १९ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ५.३० वा. होणार आहे. या समारंभासाठी पॉडिचरीच्या उपराज्यपाल डॉ. किरण बेदी या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. तसेच, भारताचे माजी परराष्ट्र सचिव पद्मभूषण श्री श्याम सरेन, भारताचे माजी मुख्य न्यायाधीश दिपक मिश्रा व भारताचे माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा हे सन्माननीय अतिथि म्हणून उपस्थित राहतील. या प्रसंगी यूपीएससी परिक्षेमध्ये भारतात तिसरी आलेली प्रतिभा वर्मा हिचा सत्कार होणार आहे. व तिला २१ हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.


         या १६ ते १९ सप्टेंबरपर्यंत चालणार्‍या चार दिवसांच्या परिषदेमध्ये १६ सप्टेंबर रोजी पहिले सत्रः यूपीएससी प्रिलियम, दुसरे सत्रः यशस्वीतांच्या यशाची यशोगाथा हे आहेत. १७ रोजी तिसरे सत्रः यूपीएसच्या मुख्य परिक्षेची तयारी, चौथे सत्रः यशाचा मंत्र आणि पाचवे सत्रः राज्यातील टॉपरशी संवाद हे आहेत. १८ रोजी सहाव्या सत्रात यूपीएससीच्या मुलाखतीची तयारी, सातवे सत्रः यूपीएससी व सीएसई परिक्षेचे बदलते स्वरूप समझून घेणे आणि आठव्या सत्रात यूपीएसीच्या तयारीसाठी इंटरनेटचा परिणाम कारण उपयोग करून घेणे या विषयावर विचार मांडले जातील. तसेच १९ सप्टेंबर रोजी आयोजित नवव्या सत्रात यूपीएससी परिक्षेचे नियंत्रक या विषयांवर भारतातील व महाराष्ट्रातील यशस्वी विद्यार्थी ऑनलाइनच्या माध्यमातून आपले विचार मांडतील.


या सेवेत प्रवेश करणारे हे विद्यार्थी भारताच्या प्रशासकीय सेवेचा महत्वाचे अधिकारी म्हणून भाग होणार आहेत. प्रशासकीय सेवा, विधिमंडळाने पारित केलेले कायदे हे योजना आणि धोरणांच्या अंमलबजावणीमध्ये महत्वाची भूमिका बजावत असते. अशा विद्यार्थ्यांचे कौतुक करावे आणि त्यांचा सत्कार करावा, त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा द्यावी, या हेतूने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.


भारतातील, तसेच, महाराष्ट्रातील यूपीएससी-एपीएससी परिक्षार्थींना या यशस्वितांचे मार्गदर्शन मिळावे, तसेच, त्यांच्याशी सुसंवाद साधता यावा ही या कार्यक्रमाच्या आयोजनामागील प्रेरणा आहे. या मार्गदर्शनातून प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हावेत हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे.


        एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी ही आध्यात्मिक व सामाजिक स्तरावर काम करीत आहे. त्याचप्रमाणे एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट ही राजकीय नेतृत्वाचे प्रशिक्षण देणारी भारतातीलच नव्हे, तर आशिया खंडातील एकमेव अशी संस्था चालविली जात आहे. सामाजिक बांधिलकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यूपीएससीमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय पातळीवर सत्कार करण्याचा संस्थेचा मानस आहे.


हा कार्यक्रम https://www.mitsog.org, www.mitwpu.edu.in <http://www.mitsog.org, www.mitwpu.edu.in> & www.bharatiyachhatrasansad.org या वेब साईट वर online असेल.


अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड, कुलगुरू डॉ. एन.टी.राव, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे वरिष्ठ संचालक रविंद्रनाथ पाटील व मिटसॉगच्या सहयोगी संचालिका प्रा. डॉ. शैलश्री हरिदास यांनी दिली.