माणुसकी जपत मदतीला धावणारे पुणेकर..! गेल्यावर्षी सांगली पाठोपाठ

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पुणे नवरात्रौ महोत्सव व मुकुल माधव फाउंडेशनच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील जयभावनीनगर व परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना 15 दिवस पुरेल असे अन्न धान्यासह विविध वस्तूंचे किट देण्यात आले व शिरोळ तालुक्यातील आलुस,बवनाड,हसुर या गावांमध्ये मदत घेऊन गेलो तेथील 52 गावांपैकी 44 गावे 12 दिवस पाण्यात होती काल परवा येथील पुराचे पाणी ओसरले असून नागरिकांच्या घरात दोन-तीन फुटापर्यंत गाळ साचला होता. घरातील गाळ काढून दिला पाण्यामुळे येथे वीज पुरवठाही खंडित करण्यात आला असल्याने नागरिक खूप त्रस्त होते.आपण नदीकाठच्या गावांना मदत पुरवणे अत्यंत गरजेचे होते. अशाच एका गावाबद्दल आमची संस्था पुणे नवरात्रौ महोत्सव व आबा बागुल मित्र परिवार आम्हाला माहिती मिळाली व आम्ही त्या गावाच्या दिशेने निघालो.परंतु या गावातील नागरिकांना अद्याप एकही मदत पोहचली नव्हती आमच्या संस्थेचा पहिलाच ट्रक मदतीसाठी पोहोचला ट्रक पाहून पूरग्रस्त नागरिक भाराहून गेले होते. आजही तो क्षण आठवला की अंगावर शहारे येतात.अशी वेळ कोणावर येऊ नये ही गणराया चरणी प्रार्थना.यावेळी माजी नगरसेवक मुख्तार शेख, नंदकुमार बानगुडे,घनश्याम सावंत,नंदकुमार कोंढाळकर रमेश भंडारी,संजय पवार,दीपक निकम,गोरख मरळ,विलास रत्नपारखी ,श्री.रजपूत,कपिल बागुल,अभिषेक बागुल , अमित बागुल मित्र परीवार सहभागी झाले होते.