बालभारती पुन्हा व्हेंटिलेटरवर : यावेळी चक्क शहिदांचा केला घोर अपमान

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*.


 


**


 


*पिंपरी :-* दरवर्षी बालभारतीकडून छपाईत चुका होतातच. अशी यावर्षी आठवीच्या पुस्तकात एक घोडचूक करण्यात आली आहे. भगतसिंग, राजगुरू यांच्यासह फासावर गेलेल्या तिसऱ्या क्रांतिकारकांच्या नावात ही अक्षम्य चूक करण्यात आली आहे. सुखदेव यांच्याजागी 'कुर्बान हुसेन' फासावर गेले, असा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, बालभारती पाठ्यपुस्तक मंडळाचे प्रभारी संचालक विवेक गोसावी यांनी अमान्य करत "ती माहिती मूळ पुस्तकात जशी मांडलेली आहे, तशीच घेण्यात आली आहे. त्यामुळे 'कुर्बान हुसेन' या नावाचा उल्लेख चुकीने केल्याचे म्हणणे नाही.'' त्यामुळे या पाठातून कोणत्याही प्रकारची सामाजिक भावना दुखावण्याचा प्रश्‍न निर्माण होत नसल्याचे स्पष्ट केले आहे.


बालभारती चुका करून वर शिरजोरी करत, खुलासा मागण्या गेलेल्या पत्रकार आणि संबंधित कार्यकत्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.


परंतु दरवर्षी याप्रमाणे चुका केल्याने बालभारतीचे आणि विद्यार्थी यांचे अतोनात नुकसान होत आहे.


याला जवाबदार असणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई होऊन, संबंधितांन कडुन झालेले आथिर्क नुकसान भरपाई घेण्यात यावी. अशी मागणी सुजाण पुणेकर करीत आहेत.