अन्याय झालेल्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी संघटित प्रयत्नांची, गांधी मार्गाची आवश्यकता* : डॉ. टेरी बिटझेल

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


press release


*अन्याय झालेल्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी संघटित प्रयत्नांची, गांधी मार्गाची आवश्यकता* : डॉ. टेरी बिटझेल
........................................
'गांधी आजच्या संदर्भात' विषयावर  डॉ.टेरी बिटझेल यांचे व्याख्यान 


पुणे:


' ज्यांच्यावर अन्याय होतो, जे वंचित आहेत,त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक जबाबदारी स्वीकारून न्यायासाठी गांधीवादी प्रेरणेने संघटित आणि अहिंसक प्रयत्न झाले पाहिजेत. त्यातून समाजाच्या धारणेची पुनर्रचना करणे हे ध्येय असले पाहिजे . गांधीजींचे जीवन कार्य त्या दृष्टीने अभ्यासले पाहिजे', असे प्रतिपादन महात्मा गांधी सेंटर फॉर ग्लोबल नॉन - व्हायलन्स 'चे संचालक आणि जेम्स मॅडीसन विद्यापीठातील जस्टीस स्टडीज विषयाचे विभागप्रमुख डॉ.टेरी  बिटझेल यांनी केले.


  'गांधी आजच्या संदर्भात' या  विषयावर  'महात्मा गांधी सेंटर फॉर ग्लोबल नॉन - व्हायलन्स 'चे संचालक आणि जेम्स मॅडीसन विद्यापीठातील जस्टीस स्टडीज विषयाचे विभागप्रमुख डॉ.टेरी  बिटझेल यांच्या व्याख्यानाला बुधवारी चांगला प्रतिसाद मिळाला. हे व्याख्यान  गांधी भवन कोथरूड येथे  बुधवार दि.११ मार्च २०२० , सायंकाळी ६ वाजता झाले. त्यावेळी डॉ.बिटझेल बोलत होते.


महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते .
 
डॉ. टेरी बिटझेल म्हणाले, 'ज्यांच्यावर अन्याय झाला , व्यवस्थेच्या रगाडयात जे मागे पडले, त्यांच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. आपण मानवी प्रश्न, समस्यांकडे सहानुभूतीने पाहतो का, हेही तपासले पाहिजे.प्रत्येक व्यक्तीला त्याच्या हक्काचा न्याय मिळालाच पाहिजे.प्रसारमाध्यमांचे त्यात चांगले योगदान असू शकते.


गांधीजींच्या जीवनकार्याबद्दल बोलताना डॉ. टेरी बिटझेल म्हणाले, 'गांधीजींनी आयुष्यात अनेक प्रयोग केले.
मोठया आव्हानांमध्ये मोठ्या संधी लपलेल्या असतात, हे त्यांना माहित होते.
मी अहिंसेकडे प्रवास करतो, तेव्हा गांधींकडे प्रवास करतो,
इतरांची सेवा हे गांधीजींनी आपले जीवन कर्तव्य मानले होते.


माणूस आता युध्दे करुन थकला आहे. त्याला सैन्यातही जायला नको असते. अहिंसा, शांततेकडे ओढा वाढत आहे, हा गांधी विचारांचा विजय आहे, अमेरिकेतही  डोनाल्ड ट्रम्प यांच्या सर्वच धोरणाबाबत पाठिंबा नाही,असेही डॉ. टेरी बिटझेल यांनी सांगीतले.


अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, ' परिवर्तनाचा मार्ग अहिंसात्मक असला पाहिजे. सध्या हिंसेने आपल्या हवे ते परिवर्तन घडवून आणण्याचा खटाटोप केला जात आहे. सत्ता आणी हिंसा एकत्र नांदते, लोकशाही अहिंसे बरोबर नांदते, हे सिध्द होते आहे. अहिंसा ही मोठी ताकद असून गांधीजी हे भारतीय परंपरेतून  आलेले सार्वकालिक सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे, हे जगाला मान्य झालेले आहे.


 कार्यक्रमाला डॉ. उर्मिला सप्तर्षी,डॉ. प्रवीण सप्तर्षी, प्रशांत कोठडिया, आशीष जेम्स, जांबुवंत मनोहर  इत्यादी मान्यवर उपस्थित होते. संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.


................................................