सर्वानी एकत्र येऊन कोरोनाशी सामाना करून मात करण्याचा यशस्वी प्रयत्न करुया..... मा.नवल किशोर राम जिल्हाधिकारी पुणे

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


कोरोना' चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी   औद्योगिक घटकांमध्ये आणि आयटी क्षेत्रात  काम करणाऱ्यांना अधिकारी व कर्मचाऱ्यांची  संख्या २० ते २५ ℅ पेक्षा जास्त नसावी..शक्य असल्यास *'वर्क फ्रॉम होम'* ची मुभा द्यावी,  आणि कमीत - कमी कामगार आणि अधिक्यांची  संख्या असावी, असे आवाहन  जिल्हाधिकारी मा.नवल किशोर राम यांनी केले.
जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोना बाबतीत मिडियातुन चांगले काम सुरू आहे.
परंतु   काहीजण गैरफायदा घेऊ पाहात आहेत.आयटी आणि 
औद्योगिक भागात  स्वताःहून  १० ते २० जणांचे टोळके करून, सामाज सेवेच्या नावाखाली आयटी आणि कंपनीत जाऊन ,फँक्टरी बंद करण्यास सांगत आहेत.असे करण्याचा यांना अधिकार कुणी दिला.....??? 
असे करताना  कुणीही कार्यकर्ते किंवा ग्रुप  आढळल्यास , एक ही केस समोर आल्यास् त्यांच्यावर १८८ कलम प्रमाणे किंवा त्याहीपेक्षा मोठे  गुन्हे दाखल करण्यात येतील, याची नोंद घ्यावी.
प्रत्येकांनी कोरोना विषयी  काळजी घेणे गरजेचे आहे.यापुढे खाजगी दवाखान्यात ही आयसीयू ची सोय केली जाईल.सर्वस्वी जवाबदारी प्रशासनाची आहे.परंतु गरजेनुसार निर्णय घेतले जातील.
ग्रामीण भागातही कुठल्याही प्रकारची अडचण येऊन देणार नाही.
सर्वानी एकत्र येऊन कोरोनाशी सामाना करून मात करण्याचा यशस्वी प्रयत्न करुया.....


मा.नवल किशोर राम
जिल्हाधिकारी
पुणे


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com


मेलवर पाठविणे बंधनकारक*